Friday, 8 March 2019

नागपूरची ‘माझी मेट्रो’ देशातील सर्वाधिक ‘ग्रीन मेट्रो’ ठरेल- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

नागपूरची ‘माझी मेट्रो’ देशातील सर्वाधिक ‘ग्रीन मेट्रो’ ठरेल- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी




माझी मेट्रो 21व्या शतकातील नागपूरची सुरुवातमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूरच्या माझी मेट्रोचे उद्घाटन
प्रत्येक स्टेशनवर ऐतिहासिक वारसा झळकणार
एकाच मार्गावरुन 3 ते 4 स्तरावर असलेली वाहतूक व्यवस्था

By Sanjay Patil--

नागपूर: मेट्रो रेल्वेमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आमुलाग्र बदल होणार असून वाहनांचा वापर कमी झाल्याने प्रदूषण कमी होणार आहे. अधिकाधिक सौरऊर्जा प्राप्त करुन देशातील अनेक मेट्रो रेल्वेंच्या तुलनेत नागपूर मेट्रो ही अधिक ग्रीन मेट्रो’ अर्थात पर्यावरणपूरक मेट्रो ठरणार असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. तर 21व्या शतकातील नागपूरची सुरुवात माझी मेट्रोच्या रुपाने होत असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी काढले.

वर्धा रोड येथील एअरपोर्ट साऊथ मेट्रो रेल्वे स्टेशन येथे नागपूरच्या माझी मेट्रोच्या उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरीपालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेजिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकरमहापौर नंदा जिचकारखासदार कृपाल तुमानेडॉ.विकास महात्मेआमदार प्रा.अनिल सोलेसुधाकर देशमुखसुधाकर कोहळेसमीर मेघेडॉ.मिलिंद मानेप्रा.जोगेंद्र कवाडेकेंद्रीय नगरविकास विभागाचे सचिव दुर्गाशंकर मिश्रमेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओलिंकद्वारे कळ दाबून माझी मेट्रोचे उद्घाटन केले. तसेच माझी मेट्रोच्या खापरी ते सिताबर्डी या प्रवासासाठी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी माझी मेट्रोच्या उभारणीसंदर्भातील कॉफी टेबल बुकचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी माझी मेट्रोट्रान्सफॉर्मिंग नागपूर-ए ड्रीम कमींग ट्रू’ या प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले.  
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून करुन सर्वांची मने जिंकली. माझी मेट्रोच्या उद्घाटनानिमित्त श्री.मोदी यांनी नागपूरकरांना भरभरुन शुभेच्छा दिल्या. व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केलेल्या भाषणात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणालेनागपूर हे जगातील वेगाने वाढणाऱ्या शहरांमध्ये समाविष्ट झाले आहे. माझी मेट्रोच्या रुपाने नागपूरकरांचे स्वप्न पूर्ण होत आहे. देशातील मेट्रो असलेल्या शहरांमध्ये आता नागपूरचाही समावेश होत आहे. माझी मेट्रोचे काम दर्जेदारपणे व अतिशय वेगात पूर्ण झाले आहे. मेट्रो रेल्वेसंदर्भात निश्चित धोरण ठरविण्यात आले असून मेट्रोचे नेटवर्क मागील चार वर्षात 650 कि.मी.ने वाढले आहे.



देशाच्या इतर भागात 
800 कि.मी. मेट्रो रेल्वेची कामे सुरु आहेत. माझी मेट्रोच्या रुपाने मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीस चालना मिळाली असून यापुढेही जसजसा मेट्रोचा विस्तार होत जाईल तसतशी येथील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. मेट्रोच्या विस्तारामुळे शहराचा चेहरा-मोहराच बदलणार आहे. याबरोबरच आता वन नेशन वन कार्ड’ ही संकल्पना साकारण्यात येत असून या एका कार्ड अंतर्गत विविध परिवहन व्यवस्थेचा प्रवाशांना लाभ घेता येणार आहे. डिजिटल भारत अशी देशाची नवी ओळख तयार होत असून देशातील युवक विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग करुन पायाभूत सुविधा उभारण्यासाठी मोलाची भूमिका बजावत असल्याचे श्री. मोदी यांनी सांगितले.
मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणालेमाझी मेट्रोचे उद्घाटन हा नागपुकरांसाठी ऐतिहासिक व आनंदाचा क्षण आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक विकसित व बळकट झाल्यास शहराच्या विकासाला हातभार लागतो. माझी मेट्रोमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल होणार असून वाहनांची संख्या कमी झाल्यामुळे प्रदूषणाला आळा बसणार आहे. चांगल्या आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे माझी मेट्रो हे प्रतिक ठरणार आहे. पर्यावरणपूरक असणाऱ्या या मेट्रोमुळे उर्जेची बचत होईलच याबरोबरच कार्बन उत्सर्जनाला आळा बसणार आहे. माझी मेट्रोसाठी 65 टक्के ऊर्जा ही सौरऊर्जेतून प्राप्त होणार आहे. हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. परिवहनपूरक विकास ही संकल्पना आता महत्वाची ठरणार आहे.

माझी मेट्रो ही अन्य परिवहन व्यवस्थेला जोडण्यात येणार असल्याने प्रवाशांचा प्रवासामध्ये खर्च होणारा वेळ व शक्ती वाचणार आहे. मेट्रोच्या परिसरात विविध विकासात्मक कामेही हाती घेण्यात येणार आहेत. माझी मेट्रोची स्टेशन्स ही परिसरातील अर्थव्यवस्थेला चालना देणारी ठरणार आहे. यातून सेवाक्षेत्राद्वारे मोठ्या रोजगार संधी निर्माण होणार आहेत. माझी मेट्रो हा नागपूरचा नवा चेहरानवी ओळख ठरणार आहे. नागपूर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कामही लवकरच सुरु होत असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
श्री. गडकरी म्हणालेअतिशय कमी वेळेत व दर्जेदार स्वरुपाचे काम माझी मेट्रोच्या रुपाने नागपूरकरांच्या समोर येत आहे. माझी मेट्रो ही अनेक अर्थानी वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. माझी मेट्रो सौरऊर्जा संपन्न तसेच स्टेशन्सची वैशिष्ट्यपूर्ण उभारणी यामुळे आगळी-वेगळी ठरणार आहे. शहरातील विविध बाजार परिसरांचा तसेच अन्य ठिकाणांचाही मेट्रोद्वारे विकास करण्यात येणार असल्याने शहराच्या विकासासाठी हे लाभदायकच ठरणार आहे. ब्रॉडगेज मेट्रोच्या रुपाने मेट्रोचा विस्तार करण्यात येणार असून ग्रामीण भागापर्यंत मेट्रो यापुढील काळात पोहोचेल. माझी मेट्रोमुळे नागपूरच्या पर्यटन विकासाला तसेच रोजगार निर्मितीलाही चालना मिळणार आहे. इलेक्ट्रिकइथेनॉल व सीएनजीवर चालणाऱ्या बसेस यासारख्या माध्यमातूनही शहरी परिवहनाच्या संकल्पना बदलत असल्याचेही श्री.गडकरी यांनी सांगितले.

श्री. मिश्र म्हणालेनागपूरच्या माझी मेट्रोच्या रुपाने देशातील 18 वी मेट्रो साकारली जात आहे. या मेट्रो व्यवस्थेमुळे शहरातील परिवहन व्यवस्थेला गती मिळणार असून माझी मेट्रो सर्वांना परवडणारी ठरेल. माझी मेट्रो ही नागपूरची नवी ओळख ठरणार आहे.
माझी मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित म्हणालेमाझी मेट्रोच्या रुपाने नागपूरकरांचे स्वप्न पूर्ण होत असून अनेक अर्थांनी ही मेट्रो वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. सौर ऊर्जेने संपन्न असलेल्या या मेट्रोमुळे शहरी परिवहनाच्या संकल्पना बदलणार आहे.
खापरी ते बर्डी टप्पा मेट्रोबाबत थोडक्यात
  • नागपूर शहराच्या वाहतूक व्यवस्थेत सुरक्षितताउपलब्धताअनुकुलता आणि गतिच्या दृष्टीने अतिशय आदर्श व्यवस्था मेट्रोच्या रुपाने निर्माण झाली आहे.
  • अल्ट्रा-आधुनिक स्टेनलेस स्टीलचे कोचेस आणि वातानुकुलित सेवा
  • ट्रेनमध्ये एक कोच महिलांसाठी राखीव
  • दिव्यांगांसाठी जागतिक स्तरावरील सोयीसुविधा
  • प्रत्येक स्टेशनवर आणि ट्रेनमध्ये पॅनिक बटन
  • डिजीटल प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म-5 डी बीआयएमच्या माध्यमातून प्रकल्प व्यवस्थापनात उत्तम कामगिरी
  • पिण्याचे पाणी आणि प्रसाधनाची सुसज्ज व्यवस्था
  • पहिल्या मैलापासून ते शेवटच्या मैलापर्यंत फिडर सर्व्हिसेस आणि मल्टी मॉडल इंटीग्रेशन
  • 100 टक्के सीसीटीव्ही कव्हरेज
  • 65 टक्के सौरऊर्जेचा वापर
  • कॉन्टॅक्टलेस कॉमन मोबिलीटी कार्ड (महाकार्ड)ची सुविधा
  • निर्मितीपासून 20 हजार लोकांना रोजगार मिळालापुढेही मिळत राहणार
  • प्रत्येक स्टेशनवर लिफ्ट आणि एक्सेलेटर
  • स्थानिक योगदान 70 टक्के देऊन मेक इन इंडियाचा उद्देश्य साध्य

Thursday, 7 March 2019

Gadkari praises Nagpur Metro project

Gadkari praises Nagpur Metro project

By Sanjay Patil-Nagpur

Nagpur, Mar 7 (Agency)Union minister Nitin Gadkari on Thursday said innovative and excellent work has been done in the Nagpur Metro project, whose first phase has started operations.

Prime Minister Narendra Modiflaggedoff the first commercial run of Nagpur Metro Rail Thursday via video conferencing.

Gadkari, addressing the gathering, said qualitative, excellent and timely work has been done in Nagpur Metro Rail work.

"I have performed ground-breaking and inauguration ceremony of works worth Rs 4 lakh crore in the last 15 days.

Similarly, Rs 1.25 lakh crore worth of works will be performed tomorrow in Lucknow. I will be performing ground-breaking ceremony of works worth Rs 1.9 lakh crore of Delhi-Mumbai Expressway and Dwarka expressway.

"But, today my happiness for Nagpur metro is most compared to all these as Nagpur is my hometown," he said.

Regular services in the first phase, covering a distance of 13.5 km from Khapri to Sitabuldi stations, will become operational from March 8.

The Nagpur metro project was started in June 2015 and it consists of two corridors. The entire project is expected to completed by financial year 2019-20.

The entire project cost is about Rs 8,680 crore.

Centre approves major reforms for Indian Army: Changes include relocation of officers, creation of new posts, human rights committee

Centre approves major reforms for Indian Army: Changes include relocation of officers, creation of new posts, human rights committee

Centre approves major reforms for Indian Army: Changes include relocation of officers, creation of new posts, human rights committee
By Sanjay Patil
New Delhi: In a major move, Defence Minister Nirmala Sitharaman has approved the first batch of reforms in the Army which include relocation of 229 officers from the Army headquarters, creation of a new post of deputy chief for military operations and strategic planning, and setting up new wings for vigilance and human rights issues, official sources said on Thursday.
Finalised after 12 independent studies, the transformative reforms in the Army are being implemented to make the 1.3 million-strong force leaner and meaner, as well as to enhance its combat capabilities. The defence minister has approved the first batch of long-pending reform measures in the Army, the sources said.
They said the number of officers being moved out is 20 percent of the total officers in the Army headquarters in the national capital, and that they will be deployed in forward locations along the borders with China and Pakistan.
They said the post of Deputy Chief of the Army Staff Strategy DCOAS (Strategy) is being created to deal with military operations, military intelligence, strategic planning and operational logistics. At present, the DG (Military Operations) and the DG (Military Intelligence) report to the Army Chief.
The defence minister also approved creation of a new information warfare wing in keeping the needs of the future battlefield, hybrid warfare and social media reality, the sources said.
They said the government has approved merging of the separate verticals of the DCOAS (planning and strategy) and the Master General Ordnance (MGO) into one office of the DCOAS (Capability Development and Sustenance).
"Towards the Army's capability based modernisation needs, this would synergise and coalesce all revenue and capital spending under one organisation and effectively prioritise competing requirements with an operational focus to get better value for funds allocated by the government," said a senior Army official.
Sources said the government has also approved creation of two new branches to deal with vigilance and human rights issues, reflecting the Army's commitment to probity and transparency. Both the branches will be headed by Major General rank officers.
The new ADG, Vigilance will function directly under the Chief of Army Staff and the new ADG Human Rights will function under the VCOAS. The ADG (Vigilance) will also have a new Vigilance Investigation Unit under him, the sources said. The reform initiatives were finalised by top commanders of the Army in October last year to usher in transformative reforms in the force.
The reforms will also include restructuring the Army's officer cadre, bringing down age of key commands, arresting rising revenue expenditure and "right-sizing" the force. Sources said the reform measures will be implemented with a sense of urgency.
The Army headquarters had instituted four studies with an overall aim to enhance the operational and functional efficiency of the force, optimise budget expenditure, facilitate modernisation and address aspirations.
The first study on 're-organisation and right-sizing of the Indian Army' was focused on the operational structures to make the force efficient and future-ready by taking into account the operational situation on western and northern borders, the spokesperson said.
The second study was on 're-organisation of the Army headquarters with an aim to bring in "integration and preclude the redundancies". The third study was on 'cadre review of officers' and its focus was to recommend how to carry out reorganisation and restructuring to meet the aspirations of the officers' cadre.
The fourth study on 'review of terms of engagement of rank and file' was aimed at harnessing the higher life expectancy and ensuring younger profile of key commands and motivation of the personnel.
जगातील पहिल्या दहा विकसित शहरात नागपूरचा समावेश- देवेंद्र फडणवीस

जगातील पहिल्या दहा विकसित शहरात नागपूरचा समावेश- देवेंद्र फडणवीस



विविध विकास प्रकल्पांचा शुभारंभ
टायगर कॅपिटलसोबत पर्यटनाची राजधानी म्हणून विकास
पायाभूत सुविधांसोबत रोजगार निर्मितीला प्राधान्य

By Sanjay Patil---नागपूर :
 नागपूरसह विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला असून मेट्रो, मिहान, एम्स् आदी विविध प्रकल्पाच्या माध्यमातून नागपूर शहराचा चेहरा बदलत आहे. जगातील वेगाने विकसित होणाऱ्या दहा शहरांमध्ये नागपूरचा समावेश झाला आहे. पायाभूत सुविधांच्या निर्मितीमुळे नागपूर शहर हे आंतरराष्ट्रीय शहर झाले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नागपूर शहरातील सुमारे २४ विविध विकासकामांचे ई-भूमिपूजन व लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. फुटाळा तलावाच्या परिसरात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, महापौर नंदा जिचकार, आमदार सर्वश्री सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, विकास कुंभारे, डॉ.मिलिंद माने, समीर मेघे, कृष्णा खोपडे, प्रा.अनिल सोले, मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, लघु उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी, महानगर आयुक्त श्रीमती शीतल उगले, महापालिका आयुक्त अभिजित बांगर, एनएचएआयचे सीजीएम मनोजकुमार, आर. के. पांडे, दक्षिण-मध्य रेल्वेच्या डीआरएम श्रीमती शोभना बंडोपाध्याय, मध्य रेल्वेचे डीआरएम सोमेष कुमार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार, अधीक्षक अभियंता व्ही. डी. सरदेशमुख आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी ‘मी खासदार’ या केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या विकासकामासंदर्भातील सिडीचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी केलेल्या विविध विकासकामांवर आधारीत विकासपुस्तिकेचे विमोचनही यावेळी करण्यात आले. गणेश टेकडी देवस्थानतर्फे पंतप्रधान सहाय्यता निधीस 21 लाख रुपयांचा धनादेश यावेळी सुपुर्द करण्यात आला.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, नागपूर शहरात मागील चार वर्षांपासून विविध विकासकामे होत असल्याने शहराचा चेहरा-मोहरा बदलतो आहे. नागपूर शहर आंतरराष्ट्रीय दर्जाचे म्हणून विकसित होत आहे. नागपूरचे आणि अजनीचे रेल्वे स्टेशन आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि आधुनिक स्वरुपाचे होत आहे. रेल्वे स्टेशनवर एस्केलेटर यासारख्या विविध सुविधा प्रवाशांसाठी उभारल्या जात आहे. अजनी रेल्वे स्टेशन हे मल्टीमॉडेल रेल्वे स्टेशनच्या स्वरुपात विकसित करण्यात येत आहे. यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकटी मिळणार असून प्रवाशांना सुविधा होणार आहे. नागपूर शहरातील रस्त्यांची, उद्यानाची तसेच खेळाच्या मैदानांच्या विकासाची कामे साकारली आहेत. फुटाळा तलाव व अंबाझरी तलावाच्या सुशोभिकरणाची कामे पथदर्शी स्वरुपाची ठरणार आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर येथे भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत नक्कीच वाढ होणार आहे. याद्वारे नागपूर पर्यटन राजधानी म्हणूनही विकसित होऊ शकते.
विविध विकासकामे साकारत असतानाच रोजगार निर्मितीवरही भर देण्यात येत आहे. मिहानच्या माध्यमातून औद्योगिक क्षेत्रात तर विविध विकासकामांच्या माध्यमातून सेवा क्षेत्रात रोजगार संधी उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात येत आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा सर्वेक्षणानुसार 2035 मध्ये वेगाने विकसित होणाऱ्या जगातील पहिल्या दहा विकसित शहरांमध्ये नागपूर शहराचा समावेश असणार आहे. रस्ते विकास आणि सौर ऊर्जा प्रकल्पांसाठीही भरीव निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. पायाभूत सुविधांचा विकासाबरोबरच समाजातील गरजू स्तरातील व्यक्तींना घरकुलेही उपलब्ध करुन देण्यात येत आहे. गरीब रुग्णांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. जनसामान्यांचे जीवनमान बदलण्यावर भर देण्यात येत असून सर्वंकष विकास साधतानांच विकासाला मानवी चेहरा प्राप्त करुन दिला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
विदर्भातील विविध विकासकामांसाठीही भरीव निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग भरीव निधी उपलब्ध करुन साकारण्यात येत आहे. हा नागपूर व विदर्भाच्या समृद्धीचा महामार्ग ठरणार आहे. विदर्भात उद्योगांसाठी सर्वात कमी वीजदर आहेत. विदर्भातील औद्योगिक क्षेत्राला याद्वारे चालना मिळणार आहे. याद्वारे रोजगार निर्मितीलाही चालना मिळणार असल्याचे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

श्री.गडकरी म्हणाले, नागपूर शहरात विविध विकासकामे साकारली आहेत. अनेक विकासकामे प्रगतीपथावर आहेत. शहराचा व परिसराचा चौफेर विकास होतो आहे. अजनी रेल्वे स्टेशनचा विकास करण्यात येत असून हे जगातील सर्वोत्कृष्ट रेल्वे स्टेशन ठरेल. सीएनजीवर धावणाऱ्या बसेस, वैशिष्ट्यपूर्ण मेट्रो, सौर ऊर्जा प्रकल्प, वीज निर्मितीसाठी सांडपाण्याचा उपयोग यासारखे नाविन्यपूर्ण प्रकल्प नागपूर शहरात साकारले जात आहेत. मध्य नागपूर शहरातील रस्त्यांची कामेही वेगात सुरु आहेत. आयआयएम व अन्य शैक्षणिक संस्था यांच्या उभारणीद्वारे येथील रोजगार निर्मितीलाही चालना मिळत आहे. मैदानांच्या विकासाद्वारे क्रीडा क्षेत्राचा तसेच शेतकऱ्यांसाठी कन्व्हेंशन सेंटरची उभारणी याद्वारे कृषी क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री.बावनकुळे म्हणाले, नागपूर शहरात विविध विकासकामे साकारत असल्याने शहराचा चेहरा-मोहरा बदलत असून शहराची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण झाली आहे. नागपूर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ साकारत आहे. नागपूर-नागभीड रेल्वे ब्रॉडगेजमध्ये रुपांतरीत करण्यात येत आहे. यासाठी भरीव निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ‘आयआयएम’सारख्या नामवंत शैक्षणिक संस्था नागपूर येथे सुरु होत आहे. नागपूर हे क्रीडा व संस्कृती संवर्धन करणारे शहर म्हणूनही ओळखले जात आहे. दीक्षाभूमी, ताजबाग व ड्रॅगन पॅलेस यासारख्या ठिकाणांच्या विकासासाठीही निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. शहरात रिंगरोड, मेट्रो तसेच वीज पुरवठा क्षेत्रातील कामेही वेगात सुरु आहेत. अमृत योजनेअंतर्गत शहरातील विविध विकासकामे पूर्ण होत आहे. जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या निधीतही भरीव वाढ झालेली असल्याचे त्यांनी सांगितले.

सूत्रसंचालन श्रीमती रेणुका देशकर यांनी केले तर आमदार सुधाकर देशमुख यांनी आभार मानले.


विकास प्रकल्पांचा ई- भूमिपूजनाद्वारे शुभारंभ
  • नागपूर-नागभीड ब्रॉडगेज रेल्वेलाईन, नागपूर-नागभीड रेल्वेलाईन
  • नागपूर रेल्वे स्टेशनवरील विविध विकासकामे
  • अजनी रेल्वे स्टेशन येथील एक्सेलेटर व इतर विकास कामांचे भूमीपूजन
  • अजनी इंटर मॉडेल स्टेशन प्रकल्प टप्पा-1 व सामंजस्य करारावर स्वाक्षरी
  • सीआयआरटी उपकेंद्र व एएसआरटीयू सेंटर अंतर्गत आयडीटीआर, गोधनी
  • नागपूर शहरातील केंद्रीय मार्ग निधीच्या विविध विकासकामे
  • नागपूर महानगरपालिकेअंतर्गत विविध विकासकामे
  • नागपूर महानगर विकास प्राधिकरण अंतर्गत विविध विकासकामे
  • फुटाळा तलाव संगीत कारंजे
  • ‘मी खासदार’ सीडीचे विमोचन
  • अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या कार्यकर्तृत्वावर आधारित पुस्तिकेचे विमोचन

Wednesday, 6 March 2019

स्वच्छ सर्वेक्षणात राज्याचा यंदाही गौरव; मुख्यमंत्र्यांकडून जनतेचे अभिनंदन

स्वच्छ सर्वेक्षणात राज्याचा यंदाही गौरव; मुख्यमंत्र्यांकडून जनतेचे अभिनंदन



By Sanjay Patil

मुंबई : स्वच्छ महाराष्ट्रासाठी जनतेने दिलेल्या सक्रीय सहभागामुळेच स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये राज्याने सलग दुसऱ्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केले असून त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेसह सर्व संबंधित घटक आणि यंत्रणेचे अभिनंदन केले आहे.
देशातील स्वच्छतेच्या चळवळीला चालना देण्यासाठी केंद्र शासनाकडून राष्ट्रीय पातळीवर स्वच्छ सर्वेक्षणाचे आयोजन करण्यात येते. याअंतर्गत बेस्ट परफॉर्मिंग स्टेटचा मान मिळालेल्या तीन राज्यांमध्ये महाराष्ट्राने स्थान पटकावले आहे. सर्व राज्यांना मिळून देण्यात येणाऱ्या 198 पुरस्कारांपैकी 46 एवढे लक्षणीय पुरस्कार महाराष्ट्राने प्राप्त केले असून पश्चिम विभागासाठी असणाऱ्या 19 पुरस्कारांपैकी 13 पुरस्कारही राज्याच्या नावावर झाले आहेत. तसेच पश्चिम विभागातील आघाडीच्या 10 शहरांमध्ये महाराष्ट्रातील शहरांचा समावेश आहेही निश्चितच कौतुकाची बाब आहे. देशातील 500 हागणदारीमुक्त शहरांच्या निवडीत राज्यातील 150 नागरी संस्थांचा समावेश झाला आहे. तसेच कचरामुक्तीसाठी स्टार रेटिंग मिळालेल्या शहरांमध्ये राज्यातील सुमारे पन्नास टक्के म्हणजे 27 नागरी संस्थांचा महत्त्वाचा वाटा आहे. अमृत योजनेंतर्गत निवडलेल्या 100 शहरांत 29 तर अमृत व्यतिरिक्त इतर घटकांमधील 100 शहरांमध्ये राज्यातील 60 शहरांनी स्थान पटकाविले आहे. त्याचप्रमाणे पश्चिम विभागांतर्गत 100 शहरांमध्ये राज्यातील 83 नागरी संस्थांचा समावेश आहे.
India dominates list of world's most polluted cities .

India dominates list of world's most polluted cities .






India garbage landfill
By Sanjay Patil

NEW DELHI: India dominated a list of the world's most polluted cities in 2018, taking 22 of the top 30 spots, according to a Greenpeace report.
Air pollution is estimated to contribute to 7 million premature deaths every year and is considered by the United Nations to be the single biggest environmental health risk.
While Delhi was again named the capital with the dirtiest air, in tenth place, neighbouring business city Gurugram, which in 2016 changed its name from Gurgaon, took the not-so-coveted top spot.
Cities in China, Pakistan and Bangladesh were also placed in the top 30.
The 2018 World Air Quality Report, compiled by Greenpeace and IQAir AirVisual, used air pollution data from tens of thousands of public and private monitoring stations across the world to rank over 3,000 cities from dirtiest down to cleanest.
At a country level, weighted by population, Bangladesh emerged as the most polluted country on average, closely followed by Pakistan and India, with Afghanistan and Mongolia also within the top 10.

"In addition to human lives lost, there's an estimated global cost of 225 billion dollars in lost labour, and trillions in medical costs," said Yeb Sano, executive director of Greenpeace South East Asia.
"This has enormous impacts, on our health and on our wallets."
The report looked at measurements of fine particles known as PM2.5, which can penetrate into the airways to cause respiratory problems.
Of the over 3,000 cities included in the list, 64 per cent exceeded the World Health Organisation's annual exposure guideline for PM2.5.
Average concentrations of the pollutant in Chinese cities fell by 12 per cent from 2017 to 2018. Beijing now ranks as the 122nd most polluted city in the world.
"In recent times, East Asia has demonstrated a strong correlation between rapid economic development and increased air pollution," the report found.
It added that as the need to reduce air pollution has become more pressing in countries like China, "extensive monitoring networks and air pollution reduction policies have been put into place."
The report also highlighted a lack of public information on air quality, particularly in Africa and South America.
Real-time information is a "cornerstone in generating public awareness and driving action to combat air pollution in the long-term," it added.

विकासाच्या माध्यमातून सामान्य माणसांच्या जीवनात परिवर्तन - देवेंद्र फडणवीस

विकासाच्या माध्यमातून सामान्य माणसांच्या जीवनात परिवर्तन - देवेंद्र फडणवीस




By Sanjay Patil -- Nagpur--
नागपुरातील गीतांजली चौक ते गांधीसागर तलावादरम्यानच्या डी.पी.रोडचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन
नागपूर : विकास योजनांची अंमलबजावणी करताना सामान्य माणसाच्या विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. विकासाच्या माध्यमातून सामान्य माणसांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यामागची शासनाची भूमिका असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

गीतांजली चौक ते गांधीसागर तलावादरम्यानच्या डी.पी.रोडचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
रजवाडा पॅलेस येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी होते. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेमहापौर नंदा जिचकारआमदार डॉ. मिलिंद मानेआमदार विकास कुंभारेनगरसेवक दयाशंकर तिवारीमहानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांची उपस्थिती  होती.
नागपूर हे 21 व्या शतकातील बदलते शहर म्हणून उदयास येत असून,त्यासाठी शहराच्या विविध विकासकामांसाठी राज्य शासन आवश्यक ती मदत करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. देशभरासह राज्यात विविध क्षेत्रांमध्ये विकासकामे सुरु आहेत. या सर्व क्षेत्रांमधील विकासकामांमुळे बदलत्या भारताचे चित्र स्पष्ट होत आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी समाजातील शेवटच्या घटकातील माणसाला लाभ मिळावाअसे शासनाचे प्रयत्न आहेत. त्यामुळेविकासाचा फायदा देशातल्या समाजातल्या सर्व घटकांना मिळत आहे. गरीबांना मालकी  हक्क पट्टे वाटपही हाच दृष्टिकोन समोर ठेवून केले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे राज्यात विविध रस्ते तसेच उड्डाणपूलाचे काम मोठ्या वेगाने होत आहे. आज डी.पी. रोडच्या कामाचेही भूमिपूजन करण्यात आले असून गांधीसागर तलावाच्या पुनर्विकासाच्या कामाला आवश्यक निधी राज्य शासनाकडून दिला जाईल. तसेच ई लायब्ररीलाही मान्यता देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देताना ई-लायब्ररीचा प्रस्ताव शासनाकडे तात्काळ पाठविण्याच्या सूचनाही त्यांनी नागपूर महानगरपालिकेला केल्या.
गांधीसागर तलाव हा नागपूरचे वैभव असूनगांधीसागरच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी आणि गांधीसागरचे पाणी शुद्धीकरण करण्यासाठी आवश्यक तो निधी राज्य शासन देईल. सोबतच महानगरपालिकेच्या शाळेची जागा अटलई-लायब्ररी करण्यासाठी मान्यता देत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.
मेयो हॉस्पिटल ते भंडारा रोड रस्त्यासह आणखी एका रस्त्याचे भूसंपादनाचे काम मंजूर झाले आहे. रस्त्याच्या विकासकामात नागरिकांचे घर जात असेल त्यांना बाजारभावाने मोबदला मिळेल.तसेच एम्प्रेस मिलच्या बाजूच्या जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे रेडिमेड गारमेंट झोन तयार करण्यात येणार आहे. या रेडिमेड गारमेंट झोनच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळणार असूनत्याबाबत ही रि-टेंडर करण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले.
शुक्रवारी तलावाचे पाणी स्वच्छ करणे कठीण काम असले तरी पाणी शुद्ध करण्याचे काम करण्यात येईल. त्यासाठी राज्य शासनाकडून आवश्यक तो निधी नक्कीच मिळेलअसा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. तसेच एम्प्रेस मिलची जागा रेडिमेड गारमेंट झोनसाठी राखीव होती. त्याठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे रेडिमेड गारमेंट झोन उभारण्यात येईल. त्यामुळे स्थानिक महिलांना रोजगार मिळणार आहे. त्या रोजगारांच्या माध्यमातून महिला स्वावलंबी होतीलअसा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
यावेळी अब्दुल रज्जाकशेख लालनूर खानमदार खानव जोहराबी नूर मदार खानबल्लु शेख शेख सुभानसय्यद खुर्शीद अलीरहमत अलीनजमा शेख रहीम,शेल लतिफशेख बाबु शेख इब्राहीमशेख बाबूअहमद खानअब्दुल रहमान शेख रमजानबेबी तब्बसुममोहमद उसुफमोहमद रमजान आणि मदन सालिकराम वर्मा यांना यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूखंड मालकी हक्क पट्टे वाटप करण्यात आले.