Thursday 6 February 2020

डॉ.नितीन राऊत यांचे निर्देश "मोर मध्यम प्रकल्पातील सौरऊर्जा प्रश्नी पुनर्निरिक्षण" : संजय पाटील

SHARE


संजय पाटील : मुंबई : मोर मध्यम प्रकल्पातील सौरऊर्जा संदर्भात महावितरणने शासकीय जागेबाबत पुनर्निरिक्षण करुन अहवाल द्यावाअसे निर्देश ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिले.    मोर मध्यम सौरऊर्जा प्रकल्प शासकीय जमिनीवर उभारण्यात यावा ही बाब महावितरणच्या विचाराधीन होती. तथापि त्या ठिकाणी निकषात बसणारी जागा नसल्याने हा प्रकल्प आतापर्यंत होऊ शकला नाही. त्या संदर्भात आमदार शिरीष चौधरी यांनी व महावितरणने जागेचे पुनर्निरिक्षण करावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार बैठकीचे आयोजन करण्यात आले.यावेळी आमदार शिरीष चौधरी, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव तथा मुख्य व्यवस्थापकीय संचालक महावितरण असिम गुप्ता तसेच पाटबधारे व जलसंपदा विभागाचे क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.      

SHARE

Author: verified_user

I AM POST GRADUATED FROM THE NAGPUR UNIVERSITY IN JOURNALISM

1 comment:

  1. सौरऊर्जा म्हणजे सुर्यापासून मिळवलेली ऊर्जा. सुर्य हा पृथ्वीवरील प्रमुख नैसर्गिक ऊर्जास्रोत आहे. ऊर्जेची गरज सध्याच्या तुलनेत काही पटीत वाढेल आणि सध्या वीजनिर्माण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या आण्विक ऊर्जा क्षेत्राने दिवसाला एक अशा गतीने अणुभट्ट्या उभारल्या तरी ही गरज पुरी होण्यासारखी नाही. शिवाय जपानमधील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जगानेही अणुप्रकल्पांचा फेरविचार करण्यास सुरवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर सौरऊर्जेचा विचार केला असता एका तासात पृथ्वीवर पडणारी सौरऊर्जा ही रूपांतरित केल्यास आपली एका वर्षाची ऊर्जेची गरज भागवण्यासाठी पुरेशी असते, मात्र हे प्रत्यक्षात आणण्यासाठी आणखी बऱ्याच संशोधनाची आवश्यकता आहे. अपारंपारिक आणि विशेषतः सौरऊर्जा क्षेत्रातील संशोधनावरील निधी तसेच जागरूकता दिवसेंदिवस वाढत आहे. सध्याच्या पारंपारिक ऊर्जास्रोतांचे पर्याय फक्त अजून काही वर्षेच उपलब्ध असणार आहेत. शिवाय त्यांच्या अनेक नकारात्मक बाजूही आहेत. अपारंपरिक ऊर्जाक्षेत्रात सौरऊर्जेशिवाय वायुऊर्जा, टायडल, जिओथर्मल असे पर्याय आहेत. मात्र, भविष्यकाळातील ऊर्जेची गरज काही अंशीच भागवण्याची क्षमता त्यात आहे. सध्या सौरऊर्जा क्षेत्रातील संशोधन हे मुख्यतः सौरऊर्जा ही पारंपरिक ऊर्जास्रोतांपेक्षा कमी खर्चिक करण्यासाठी चालू आहे. जपान, जर्मनी या सौरऊर्जेतील परंपरागत शिलेदारांसकट अमेरिका शिवाय चीन आणि भारतानेही याबाबत पुढाकार घेतला आहे. सौरऊर्जा निर्मितीत आणि नंतर वापरातही कुठल्याही प्रकारचे अपायकारक वायू वातावरणात सोडले जात नाहीत. त्यामुळे प्रदूषण, ग्लोबल वार्मिंगसारखे इतर ऊर्जाक्षेत्रांशी निगडित वादांचे विषय सौरऊर्जेपासून मात्र चार हात दूरच आहेत.

    ReplyDelete